Tuesday, April 5, 2011

कबीर वाणी १

प्रिय मित्र वर्ग
कबिरांचा एक दोहा खाली देत आहे. त्यानंतर त्याचा सामान्य अर्थ देत आहे. व पुढे काही प्रश्न आपणासमोर ठेवीत आहे. आपले विचार कळवावेत ही विनंती.



कबीर वाणी



सिंहों के लेहंडे नहीं, हंसों की नहीं पात I

लालों की नहीं बोरीयां, साध न चलै जमात II



संत कबीर आवर्जून व स्पष्टपणे सांगताहेत की,

सिंह कधी कळप करून रहात नाहीत, हंस रांगा करून रहात नाहीत. रत्नांनी भरलेली पोती कधी आढळत नसतात. त्याच प्रमाणे साधू-महापुरुष हेही पंथ-संप्रदाय असा जमाव करून रहात नाहीत.



कबीर हे एक लोकोत्तर संत होऊन गेले. अत्यंत सामान्य पद्धतीचे जीवन जगले. व्यवसायाने कोष्टी. सतत कामात दंग. पण निरंतर नामस्मरण, तेही कोरडे नव्हे तर अत्यंत प्रेमपूर्ण. कोणत्याही कर्मकांडात न अडकता त्यांनी आदर्श असा कर्मयोग आचरणे पसंत केले. कर्म आचरीत असताना स्वत:चा लोप करीत त्यांनी आत्मसाक्षात्कार साधला. पण त्यानंतर समाजाला अत्यंत सरळ सोप्या भाषेत अध्यात्म समजावून सांगण्याचे व्रत अंगिकारले हे विशेष. कोणतेही बोजड उदाहरण न देता, व्यवहारातील, सर्वांना सहज कळतील अशी चपखल उदाहरणे घेत त्यांना जे सांगावयाचे आहे ते दोह्यांच्या माध्यमातून ते सांगत गेले.

या वर दिलेल्या दोह्यातून एक सहजसोपा पण मोलाचा संदेश त्यांनी आपल्याला दिला आहे. सिंह एकटाच राहतो त्याला कळप करण्याची आवश्यकता वाटत नाही. हंस एकटाच आढळतो. त्यांच्या रांगा दिसून येत नाहीत. रत्ने ही दुर्मिळच असतात. ती खंडीभर वा पोतीभरून मिळत नाहीत. एखादे रत्न सापडले तर नशीब. पण कबीर संकेत मात्र अशा रीतीने करतात की रत्न हे एकट्यानेच आढळते, समूहाने नाही. आणि शेवटी या सर्व गोष्टींवरून ते सांगतात की साधू व महापुरुष हेही एकटे असतात, त्यांना जमावाची, संप्रदायाची वा पंथाची (स्थापन करण्याची) आवश्यकता भासत नाही.

स्वसामर्थ्यावर निर्भर असणाऱ्यांना उधार उसनवार शक्तीची गरज नसते. परमेश्वराने सिंहाला जे बळ जन्मात:च दिलेले असते त्या जोरावर त्याला वनराज ही पदवी आपोआप प्राप्त झालेली असते. त्यासाधी त्याला कोणता अभ्यासक्रम करावा लागत नाही की कोण्या विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र घ्यावे लागत नाही. म्हणून तर म्हटले जाते की ‘स्वयमेव मृगेन्द्रता’. त्या स्वबळाच्या जोरावर तो एकटा निर्भयपणे वावरू शकतो. इतरांच्या कुबड्यांची गरज घेणे त्याच्या स्वभावात नसते. समाजाच्या मान्यतेचा प्रश्न म्हणूनच त्याचेपुढे उभा रहात नाही. येणाऱ्या संकटांशी मुकाबला करायला ही आत्मनिर्भरता पुरेशी आहे.

परमेश्वराने हंसाला नीरक्षीर विवेक उपजतच दिलेला आहे. दूध व पाणी वेगळे कसे करावयाचे याचे ज्ञान त्याला परमेश्वर कृपेने उपजतच असते. त्यासाठी त्याला विशेष प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. तशी जरूरही पडत नाही. तो अलौकिक गुण माहित असल्याने त्या नादात हंस स्वत:च्याच आनंदात मग्न असतो. त्यामुळेच त्याला अन्य बांधव व मित्रांच्या सहवासावर अवलंबून राहण्याची निकड वाटत नसावी. आंतरिक सामर्थ्याने तो आत्मतृप्त असतो.

रत्न हेही विपुल संख्येत सापडत नाही. मुळात आधी कोणतेही रत्न व हिरा तसा सापडायला दुर्मिळच. त्यात तो विपुल संख्येने उपलब्ध असणे अधिकच अवघड. कबिरांचे म्हणणे असे की रत्न एकटेच असणे पसंत करते कारण त्याला सहवासासाठी अन्य रत्नांची आवश्यकता नसते. त्याच्या असण्याला इतर रत्ने असण्यानसण्याशी काहीच सोयरसुतक नसते. त्याच्या तेजाशी इतरांचे असणे नसणे याचा काहीच संबंध नसतो. याचे कारण कबीरांच्या मते त्या रत्नाचे आंतरिक तेज हेच आहे. इथे कबीरांनी रत्नाला सिंह व हंसाप्रमाणे सजीव करून टाकले आहे.

हे सगळे दृष्टांत देउन झाल्यानंतर संत कबीर साधुपुरुषांची गोष्ट करतात. ते सांगतात की साधुपुरुषांना (त्यांच्या अस्तित्वासाठी) जमाव करण्याची जरुरत नसते. ते आत्मसामर्थ्याच्या प्रभावात मग्न असतात. त्यामुळे त्यांना जगण्यासाठी समाजाच्या सहवासाची आवश्यकता पडत नाही. ते एकटे राहू शकतात. किंबहुना ते एकांतात अधिक रमलेले दिसून येतात. म्हणूनच सिंह, हंस व रत्नांचे एकटेपणाचे दृष्टांत त्यांनी आधी दिलेले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस, योगी अरविंद अशी असंख्य उदाहरणे हा डोह सिद्ध करतात. हिमालयात अनेक साधुपुरुष, ऋषी मुनी तप्साधानेत दंग असतात. त्यांना आत्मसाक्षात्काराचे आधी वा नंतर समाजापेक्षा एकटे राहण्यात अधिक स्वारस्य असते.

इथपर्यंत आपल्याला कबीर पूर्णपणे पटतात. आत्म-सामर्थ्यावर निर्भर असणाऱ्यांना समाज हवाच असतो, मान्यतेसाठी वा स्व-अस्तित्वासाठी जमाव वा इतरेजन यांची आवश्यकता पडत नाही. त्यांची अंतर्गत उर्जा त्यांना जीवनप्रेरणा देत असल्याने बाह्य प्रेरणांची/साधनांची त्यांना जरूर लागत नाही. ते सतत त्या आत्म-मग्नतेच्या धुंदीत मस्त असतात. त्यांना कोणत्याही प्रसिद्धीची हाव नसते, प्रमाणपत्राची गरज नसते. ज्ञानतृप्त अवस्था त्यांना कायम स्वरूपाची लाभलेली असते.

मान्य. एकदम मान्य. मग हे संत / साधुपुरुष समाजात कशासाठी येतात? समाज प्रोबोधन कशासाठी करतात? अनेकवेळा त्यांचे उपदेश म्हणजे अरण्यरुदन ठरते, तरीपण ते उर्वरित जीवन हा खटाटोप करण्यात वाया का घालवतात? स्वत: कबीर समाजाला समजावत का बसले? वर लिहिलेले सर्व संत समाजाच्या उद्धारासाठी का खपले? अगदी त्या समाजाने त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली तरी? ते जर समाजाशिवाय एकटे राहू शकत होते, पंथ-संप्रदाय यांची त्यांना गरज नव्हती तर ते हा सारा उपद्व्याप का करत बसले? लौकिकदृष्ट्या त्यांना त्रासाच झाला तरीही त्यांनी समाजाला जागे करण्याचे व्रत जीवनभर का पाळले? विसोबा खेचर संत ज्ञानेश्वरांना, मंबाजी संत तुकारामांना दीर्घकाळ त्रास देत होते हे सर्वांनाच ठाऊक आहे. तरीही संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव अशी ग्रंथसंपदा समाजासाठी निर्माण केली, संत तुकारामांनी सर्वांसाठी गाथा लिहिली (जी समाजकंटकांनी एकदा इंद्रायणीत बुडवलीही होती). सम्प्पूर्ण जीवनभर त्रास सहन केलेले संत ज्ञानेश्वर सर्वांच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाकडे पसायदान मागतात. हे सर्व ते का करतात? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. त्यावेळी ते एकांतात आत्ममग्न अवस्थेत का राहू शकले नाहीत. कबीरांच्या म्हणण्याप्रमाणे अशा संतमंडळींना समाजाची आवश्यकता नसताना ते समाजात सतत का बरे वावरत होते? कोण बरोबर, कबीर की संत मंडळींचे समाजासाठी खर्च केलेले सक्रीय आयुष्य बरोबर? आपले काय मत आहे. कळवाल का?

Monday, March 7, 2011

Chetna : A Laboratory (VJTI Hostel)

चेतना – एक प्रयोगशाळा
सुरेश नाखरे
वीरमाता जिजाबाई तंत्र शिक्षण संस्थेत मी मे १९९४ मध्ये वसतिगृह प्रमुख म्हणून रुजू झालो. सरस्वती वाचनालय सुरु झाले व त्या अंतर्गत चेतना, गणेशोत्सव असे अनेक कार्यक्रम / उपक्रमही सुरु झाले. या कार्यक्रम / उपक्रमांची मुळात आवश्यकता का व कशी निर्माण झाली व ती आजही कशी महत्वाची आहे याचा योग्य पद्धतीने उहापोह करण्याची गरज कधी नव्हे इतकी आज निर्माण झाली आहे. ही प्रक्रिया कशी आहे, तिच्या मुळाशी कोणती मूलतत्वे आहेत, ती कशी राबवली जाते, या प्रक्रियेची फळे कशा प्रकारची आहेत, या प्रक्रियेला सातत्याने यश कसे प्राप्त होते हा खरे म्हणजे अभ्यासाचा विषय आहे. पण हे काही समजावून घ्यायचेच नाही व कुठल्यातरी चुकीच्या मानीव व ऐकीव गोष्टींच्या आधारे ही प्रक्रियाच उखडून टाकावयाची असा प्रकार गेली दोन वर्षे सतत चालू असून त्यामध्ये अभिनिवेशाने भाग घेणाऱ्या शिक्षक-अधिकाऱ्यांची भरच पडत आहे हे एका अर्थाने दुर्दैव होय.
चेतना ही एक duplicating activity आहे. चेतना चे आतापर्यंतचे स्वरूप बदलून ते SocialSocial -PratibimbGroup चा एक भाग म्हणून चौथ्या दिवशी चेतना दिन अशा स्वरूपात साजरा करावा अशा विविध कल्पनाही पुढे आणल्या जात आहेत. चेतना च्या नावे असणारी अधिकृत Budgeted Amount सतत नाकारली जात आहे. जणू कोणी आपल्याच खिशातून ही रक्कम देते आहे. चेतनाला सभागृह मिळत नाही, सेमिनार रूम्स मिळत नाही, प्रांगण नाकारले जाते, रक्तदान शिबिरासाठी Textile Hall मिळत नाही. चेतनाला संस्थेत प्रसिद्धी करण्यास बंदी आहे, नुकतीच प्रायोजक मिळवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. जणू काही चेतना हे एक भयंकर मोठे संकट आहे, तो एक साथीचा रोग आहे, चेतना झाला तर संस्थेचे फार मोठे नुकसान होणार आहे अशी या विरोध करणाऱ्या शिक्षक अधिकाऱ्यांची व संचालकांची समजूत झाली आहे. मूळ कारण काय आहे ते सूज्ञांच्या लक्षात येईलच तो भाग वेगळा.
हे सर्व फार चांगल्या हेतूने घडते आहे अशी गोष्ट नाही. काही जण संचालकांच्या विरोधात कशाला जा अशा भूमिकेत आहेत पण हे उघड मान्य करण्याचे धैर्य नाही. मग विद्यार्थ्यांना उपदेशाचे डोस पाजण्यास तयार. म्हणूनच चेतना व तत्सम कार्यक्रम / उपक्रम नीट समजून घेण्याची आवश्यकता प्रकर्षाने आज निर्माण झाली आहे.
संस्थेचे दोन अडीच हजार विद्यार्थी – विद्यार्थिनी दरवर्षी चेतनाची उत्कंठेने वाट पाहतात व चेतना सुरु होताच त्यामध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होतात. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, रक्तदान शिबीर अशा जवळ जवळ ४० प्रकारांमध्ये हे हजारो जण भाग घेतात. वसतिगृहाचे शंभरएक विद्यार्थी चेतना यशस्वी होण्यासाठी विविध समित्या व उपसमित्यांद्वारे समरसून काम करीत असतात. शेवटच्या दिवशी वसतिगृहातील ६०० विद्यार्थी , मेस-कर्मचारी व अन्य कर्मचारी, तसेच विशेष अभ्यागत मिळून ८०० ते ९०० जण क्रिकेट मैदानावर रात्रीचे भोजन एकत्र घेतात. मग इतक्या उत्साहात, शिस्तीत चालणारा बहुरंगी व चैतन्यपूर्ण चेतना होतो तरी कसा असे कुतूहल असलेल्यांनाही चेतनाच्या इतिहासात डोकावून पहावे लागेल.
म्हणूनच गेली १६ वर्षे चेतनाचा एक सक्रीय साक्षीदार राहण्याचे भाग्य लाभल्याने मी हा धावता आढावा घ्यायचे ठरविले आहे. यामुळे सर्वांची उत्कंठा भागेलच असे नाही पण बऱ्याच जणांचे प्रामाणिक प्रश्न व कुतूहल शमेल असे वाटते. निदान चेतनाचा विरोध थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल असे मानून मुद्दे लिहिण्यास घेतो.
1. १९९३ हे वर्ष संस्थेच्या दृष्टीने Ragging संदर्भात खूपच गाजले. एका पदविकेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यावर भीषण ragging झाले व त्याला भीतीने संस्था सोडून जावे लागले. राज्याच्या मुख्यसचिवाने तातडीने पावले उचलली. त्या वेळच्या प्राचार्यांना ताबडतोब मंत्रालयात बोलावले गेले व दोषी विद्यार्थ्यावर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले गेले. २४ तासात सदर दोषी विद्यार्थी संस्थेतून कायमचा निलंबित झाला. त्या काळात असे ragging चे प्रकार, संस्थेत, संस्थेच्या वसतिगृहात तसेच संस्थेबाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात होत होते. वसतिगृहातील काही गुंडपुंड विद्यार्थी या ragging प्रकारांमध्ये सक्रीय असायचे. संस्थेत Anti-ragging Committee होती. मी, माझे सहकारी शिक्षक, सुरक्षा कर्मचारी व काही ज्येष्ठ विद्यार्थी यात मनापासून काम करीत असत पण काही झाले तरी हे काम म्हणजे दिसली आग की विझव अशा प्रकारचे (fire-fighting) होते. मूळ उपाय होत नव्हता. साखळी तुटत नव्हती. प्रभावी उपाय सापडत नव्हता. काही तरी चुकत होते. काय ते कळत नव्हते.

अशा स्थितीत मे १९९४ मध्ये मी संस्थेच्या वसतिगृहात वसतिगृह-प्रमुख या पदावर रुजू झालो. वसतिगृहात रहावयास आलो. मित्रांनी प्रथम हे पद स्वीकारण्यास खूप विरोध केला होता. कुठे अडचणीत चालला आहेस. वसतिगृहाच्या आसपास असणाऱ्या बारमधली एकूण मिळणारी दारू वसतिगृहात सापडेल इथपासून ते मुलाबाळांचे नुकसान करून घेशील इथपर्यंत सर्व कारणे माझ्या तोंडावर त्यांनी फेकली. पण तरुण विद्यार्थ्यांमध्ये काम केल्याचा अनुभव व त्यांच्या कार्यशक्तीवर असलेला प्रचंड विश्वास या आधारावर मी येथे येण्याचा निश्चय केला व रहावयास आलो. १७ वर्षांच्या वास्तव्यात हा निर्णय चुकला असे मला व कुटुंबाला कधीही वाटले नाही आणि याचे सर्व श्रेय येथील विद्यार्थ्याना व त्यांनी वर्षानुवर्षे उत्साहाने चालू ठेवलेया विविध उपक्रमांना जाते. या विविध कार्यक्रम व उपक्रमांनी वसतिगृहाचे वातावरण उच्च दर्जाचे राहिलेच पण संस्थेच्या वातावरणामध्येही चांगल्याची भर पडली हे जवळून पाहणाऱ्याच्या ध्यानात येईल.

विषय थोडा दूर गेला. तर त्यावेळी म्हणजे १९९४ पूर्वी वसतिगृहाचे नेतृत्व गुंड-पुंड, अनेक वर्षे नापास होऊनही वसतिगृहात जणू आजीव सदस्य असल्याप्रमाणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे होते. हे विद्यार्थी व्यसनाधीन होतेच पण त्यासाठी लागणारा पैसा गरीब सुसंस्कृत विद्यार्थ्यांकडून दमदाटी करून लुबाडण्यात येई. त्यांचा उर्वरीत वेळ ragging, मारामाऱ्या, दमबाजी अशा उद्योगात जाई. त्यांचेवर कठोर कारवाई करण्यास वसतीगृह अधिकारी तयार नसत म्हणा वा त्यांच्यामध्ये सद्गुण अतिरेक होता म्हणा किंवा ते दुर्बल होते म्हणा पण त्यामुळे हे विद्यार्थी अधिकच मस्तवाल झाले होते. मला मात्र प्राचार्य, विभागप्रमुख, अनेक विभागांतील काही ज्येष्ठ शिक्षक यांचा पाठिंबा मिळाल्याने या मस्तवाल विद्यार्थ्यांविरुद्ध कठोर कारवाई करता आली. एका अर्थाने स्वच्छता मोहीम राबविता आली. अनेक अपात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहातून हाकलण्यात आले. व्यसनांवर पूर्ण बंदी घातली गेली. कठोर नियम लागू झाले. Raggging मध्ये दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून व संस्थेतूनही निलंबित करण्यात आले. प्रकरण उच्च न्यायालयातही गेले पण न्याय संस्थेच्या बाजूनेच लागला. राज्यामध्ये नंतर जो Anti-ragging Act लागू केला गेला त्यासाठी या केसेसचा व संस्थेचा फार मोठा प्रत्यक्ष हातभार लागला होता हे नीट लक्षात घेतले पाहिजे. गेली १५-१६ वर्षे ragging नावालाही उरले नाही, ना संस्थेत ना वसतिगृहात. साखळी तुटली. व्यसनांनाही आपला गाशा गुंडाळावा लागला.

पण केवळ कठोर कारवाई व कायद्याचा बडगा कायमस्वरुपी ठरू शकत नाही हे लक्षात आले. चांगल्या कार्यक्रमांची / उपक्रमांची जोड जर दिली गेली नाही तर पोकळी राहील व जुनी दुखणी परत पाय पसरतील हे ओळखायला फार मोठी बुद्धी आवश्यक नव्हती व नाहीही.

2. आजची शिक्षणपद्धती, सकाळी ९ ते संध्याकाळी ५ इतका प्रचंड वेळ classrooms & laboratories यांमध्ये जखडून ठेवते. अभ्यासक्रमामध्येही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याची तरतूद नाही. ही गोष्ट कोणत्याही विचारशील व संवेदनाशील शिक्षकाला मान्य होणारी आहे. विद्यार्थ्यांच्या या तरुण वयात त्यांचातील सुप्त सद्गुण व सुसंस्कार जागे व्हावेत, त्यांच्या शरीर-मन-बुद्धी इत्यादींचा सर्वतोपरी विकास व्हावा हा उद्देश्य पूर्ण करण्यास या अपुऱ्या शिक्षण पद्धतीस विविध प्रकारच्या कार्यक्रमांची व उपक्रमांची खूप मोठी आवश्यकता असते. काही प्रमाणात ही गरज संस्था Technovanza, Social-Pratibimb & Enthusia या उपक्रमांतून पूर्ण करतेही. पण हे सर्व कार्यक्रम एकतर एकूण १ महिन्यात संपतात, तसेच यात बराचसा भाग आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचा वा आंतरविभागीय स्पर्धांचा असतो. म्हणजे संस्थेतल्या केवळ ५ % विद्यार्थ्याना यात भाग घेता येण्याजोगी शक्यता असते. म्हणजेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने हे उपक्रम फारच अपुरे आहेत हे लक्षात येते.

3. वसतिगृहातील विद्यार्थी स्वत:च्या घरापासून दूर राहतात. आई-वडील यांचे प्रत्यक्ष नियंत्रण त्यांचेवर फारच कमी किंवा नगण्य असते. मोकळा वेळ बराच असतो. मुंबईसारख्या मायानगरीत हा वेळ मजेत घालविणे याची पूर्ण मोकळीक या विद्यार्थ्यांना सहजच प्राप्त झालेली असते. मुंबई व उपनगरातून रोज येऊन-जाऊन करणाऱ्या विद्यार्थ्याना अशी सुसंधी फारच कमी असते. मुंबईत असणारे बार, चैनीची हॉटेल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, रेड लाईट एरीआज, विडीओ पार्लर्स, परमीट रूम्स अशी नादी लावणारी अनेक मोहाची व आकर्षणाची ठिकाणे त्यांच्यासाठी स्वागतसज्ज आहेत. पैशाचा चुराडा होतोच पण वाईट व्यसने लागतात ती कायमचीच. हीच व्यसने पुढे त्यांचे आयुष्य उध्वस्त करतात. अशा वेळी मोकळा वेळ सत्कारणी लागावा म्हणून या नियंत्रणमुक्त विद्यार्थ्याना सुयोग्य कार्यक्रमांची व उपक्रमांची किती मोठी आवश्यकता असते हे आणखीन निराळे सांगण्याची जरूर नाही.

4. सुमारे ६०० विद्यार्थी वसतिगृहात रहातात. हे विद्यार्थी निष्कारण विनाउद्योग राहिले तर वाईट प्रथा बोकाळायला फारसा वेळ लागणार नाही हे निश्चित. हे विद्यार्थी महाराष्ट्राच्या/ भारताच्या कानाकोपऱ्यातून येतात (प्रांतभेद, विभाग-जिल्हाभेद), ते निरनिराळ्या धर्माचे, पंथाचे, जातीचे असतात (धर्मभेद, पंथभेद, जातीभेद), वेगवेगळ्या आर्थिक व सामाजिक स्तरांमधले असतात (आर्थिक भेद, सामाजिक भेद), विविध सांस्कृतिक भेदांनी युक्त असतात, उद्योजक, नोकरदार, शिक्षक, सैनिक अशा विविध पेशांमधले असतात. शैक्षणिक स्तर अगदी भिन्न असतात. या सर्व भेदांच्या वर मात करून, छोटे छोटे घातक गट बनवण्याच्या स्वाभाविक प्रवृत्तींवर विजय मिळवून, एकसंध असे वातावरण निर्माण करावयाचे असल्यास रचनात्मक कार्यक्रमांची / उपक्रमांची जोड या विद्यार्थ्याना, विशेषत: १०-११ महिने एकत्र राहणाऱ्या या विद्यार्थ्याना आवश्यक ठरते.

5. हे विद्यार्थी बहुसंख्येने महाराष्ट्राच्या ग्रामीण वा निमशहरातून आलेले असतात. मराठी माध्यमातून शिकल्याने न्यूनगंड असतो. पण जे इंग्रजी माध्यमातून शिकून येतात त्यांचेही भाषाकौशल्य फारच खालच्या स्तराचे असते. एकूणच या विद्यार्थ्यांचा संपूर्ण गुणस्तर मुंबई व उपनगरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत खूपच कमी असतो हा सगळ्यांचाच अनुभव आहे. भाषा कौशल्य, सभाधीटपणा, वक्तृत्वकला, नेतृत्वकला, एकत्रित काम करण्याची कला, निर्णयक्षमता. वागण्यातला मोकळेपणा , धीटपणा या व अशा अनेक बाबतीत मागे असल्याने तसेच ज्या भागातून आले त्या भागाचा मागासपणा जोडीला असल्याने ते खूप बुजरे होतात. म्हणून या गुणांची वाढ होण्यासाठी वसतिगृहात काही विशेष उपक्रमांची आवश्यकता असते हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही.

6. आई वडील, कुटुंब, सगे सोयरे, नातेवाईक व समाज दूर ठेवून हे विद्यार्थी मुंबईसारख्या अनोळखी, Indifferent, पूर्ण व्यावसायिक शहरात, जिथे आपण व आपले कुटुंब या व्यतिरिक्त विचार केला जात नाही अशा शहरात आलेले असतात. इथे सुधारणे सोडाच बिघडण्याची शक्यताच अधिक. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांच्या मागे पडलेल्या कौशल्य कलांना वाव देण्याला शक्ती व वेळ कोणाकडे आहे? म्हणून त्यांचा एकंदरीत स्तर किमान शहरी विद्यार्थ्यांइतका तरी राहील, त्यांचा बुजरेपणा जाईल, मुळात असणारा शुध्द रांगडा स्वभाव कायम ठेवून त्याला योग्य शोभणारे सुसंस्काराचे कोंदण तयार करील असे कार्यक्रम / उपक्रम वसतिगृहात राबवणे गरजेचे आहे हे विचारांती कोणालाही पटेल.

7. त्याचबरोबर इतरांच्या तुलनेत शैक्षणिक प्रगतीचा दर्जा (Academic Performance and Grade) सुद्धा उत्तम राहील याची काळजी घेण्याचीही आवश्यकता असते. अशा कार्यक्रमांत / उपक्रमांत नेतृत्व सोपवतानाच त्याचा शैक्षणिक दर्जा उत्तम आहे हे तपासून बघितले जाते. प्रत्येक पदांचे वाटप अगदी शैक्षणिक प्रगती उत्तम आहे असे बघूनच केले जाते. तसेच ही पदे / नेतृत्व पार पाडताना त्या दर्जाकडे दुर्लक्ष होणार नाही ना यावर लक्ष ठेवण्यास सांगितले जाते. किंबहुना असे नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा या निमित्ताने सहजच उपलब्ध होते. वसतिगृहा प्रमुख- ज्येष्ठ विद्यार्थी - विद्यार्थी नेते – विविध समित्या, उपसमित्या यांच्या माध्यमातून एक साखळी आपोआप तयार होते असा आजपर्यन्तचा अनुभव आहे. त्यामुळे वसतिगृहातून गेल्या १७-१८ वर्षात उत्तम दर्जा घेउन बाहेर पडलेले शेकडो विद्यार्थी आज किती मोठ-मोठ्या पदांवर विराजमान आहेत, देशात व परदेशात. आणि त्याचे सर्व श्रेय ते वसतिगृहातील या कार्यक्रमांना / उपक्रमांना कसे देतात हा खरोखरीच एक संशोधनाचा विषय आहे.

8. म्हणूनच वसतिगृहात एक रचना गेल्या अनेक वर्षात स्वाभाविकरीत्या प्रस्थापित झालेली आहे. प्रथम वर्षाचे विद्यार्थी वसतीगृह व संस्थेच्या अनेकविध कार्यक्रमांत / उपक्रमांत volunteer म्हणून भाग घेतील असे बघितले जाते. स्वत:च्या कोशातून बाहेर पडण्यासाठी हे आवश्यक ठरते. दुसऱ्या वर्षी हे विद्यार्थी वसतिगृहातील अनेक कार्यक्रमांत / उपक्रमांत नेतृत्व करतात. विविध कार्यक्रमांत / उपक्रमांत शे-दीडशे विद्यार्थी कार्यकर्ते या नात्याने भाग घेतात. अत्यंत जबाबदारीने, सर्व चांगल्या प्रथा सांभाळीत ते हे सारे कार्यक्रम ठराविक काळात यशस्वीपणे पार पाडतात. त्याच वर्षी ते संस्थेच्या सर्व कार्यक्रमात क्रियाशील कार्यकर्ते म्हणून दुय्यम स्तरावर जबाबदारीने काम करतात. तिसऱ्या वर्षी हे कार्यकर्ते संस्था स्तरावर नेतृत्व करण्यास सज्ज होतात. त्याही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडतात. त्याच वेळी वसतिगृहातील दुसऱ्या वर्षीच्या नेतृत्वाला मार्गदर्शनही करतात. चौथ्या वर्षी हे विद्यार्थी संस्था व वसतिगृहातील नेतृत्वाचे पालक म्हणून, मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. तसेच निरनिराळ्या प्रवेशपरीक्षांची जोरात तयारीही करतात. ही एक यशस्वी परंपरा आपोआप निर्माण झाली आहे.

9. वसतिगृहात ‘स्वच्छ’, ‘पारदर्शी’, व ‘सद्हेतूंनी युक्त’ असे नेतृत्व तयार होते. त्यांच्या मनात वसतीगृह आणि संस्था यांचेबद्दल एक विशेष आत्मीयता आणि आस्था रुजलेली असते. सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे हे असंख्य विद्यार्थी संस्थेच्या सर्व कार्यक्रमांत / उपक्रमांत अत्यंत उत्साहाने, निरलसपणे, नि:स्वार्थीपणे सहभागी होतात. नेतृत्व करतात. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास याला साक्ष आहे. या सक्रीय सहभागामुळे व नि:स्वार्थी नेतृत्वामुळे संस्थेच्या सर्व कार्यक्रमांत / उपक्रमांत एक वेगळाच प्रभाव जाणवतो हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मुळात गणेशोत्सव, चेतना असे कार्यक्रम / उपक्रम वसतिगृहातील नेत्यांनी संपूर्ण संस्थेतील विद्यार्थ्यांकरीता राबविले असल्याने संस्था विरुद्ध वसतीगृह हा अन्यत्र आढळून येणारा व घातक कलहाचे मूळ असणारा भेद इथे आपोआप अस्तित्वातच उरत नाही. तसेच प्रत्येक पैशाचा विनियोग व्यवस्थितपणे कसा करावा,विद्यार्थ्यांकडून जमा होणारा निधी हा भ्रष्टाचारमुक्त असा कसा वापरला जावा, वेळच्या वेळी हिशेब योग्य पद्धतीने व चोख पद्धतीने कसे सदर करावेत, प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी वातावरण सुयोग्य, नियमबद्ध, संयमित कसे राहील याची काळजी घेणे, पूर्व-नियोजन व पूर्ण-नियोजन कसे करावे, ही संस्था माझी आहे व म्हणूनच इथल्या प्रत्येक कार्यक्रमाला बट्टा लागणार नाही ही जबाबदारीही माझीच आहे या भावनेने डोळ्यात तेल घालून काम कसे करावे या सर्व गोष्टींची रंगीत तालीम वसतिगृहात आधीच झालेली असल्याने संस्थेचे कार्यक्रम यशस्वी व उच्च स्तरावर पार पडतात. आणि यापाठीमागे असणारे बहुसंख्य हात हे वसतिगृहातील सुसंस्कारानी गंधित झालेले असतात हे डोळे नीट उघडे ठेवले तर कोणाच्याही लक्षात आल्यावाचून राहणार नाही. फक्त मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा हवा. मोकळेपणा हवा. आणि हे सर्व कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडल्यावर श्रेयाची भाषा मात्र या देवदुर्लभ कार्यकर्त्यांच्या तोंडी कदापीही आढळत नाही हे विशेष.

10. वरील सर्व मुद्यांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येईल की सरस्वती वाचनालय व त्या अंतर्गत दहीहंडी, १५ ऑगस्ट, गणेशोत्सव, दसरा, कोजागिरी, २६ जानेवारी, चेतना, गुढी पाडवा इ. अनेक कार्यक्रमांची आणि उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. इंजिनीअर अधिक काहीतरी चांगले, सर्वांगीण विकास, स्वच्छ व पारदर्शी नेतृत्वनिर्मिती, सुजाण नागरिक निर्मिती अशा अनेक संकल्पना इथे राबविल्या गेल्या त्या अशा अनेकविध कार्यक्रमांतून व उपक्रमांतून. ही प्रक्रिया आजही प्रचंड उत्साहाने राबवली जात आहे. त्याचा थेट प्रभाव संस्था व वसतीगृह या दोन्ही ठिकाणाचे वातावरण चांगले राहण्यावर निश्चितच पडला आहे हा भाग महत्वाचा. पण यापुढेही जाउन असे म्हणता येईल की ही प्रक्रिया अत्यंत मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. इथून तयार होउन हे विद्यार्थी बाहेरच्या विश्वात निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर रुजू झाली. तिथेही त्यानी घेतला वसा टाकला नाही. आपापल्या जबाबदाऱ्या अत्यंत यशस्वी पार पडतानाच सामाजिक भान सुटले नाही, मूल्यांशी प्रतारणा झाली नाही, बंधुत्वाची भावना अखंडपणे जपली गेली. आणि या साऱ्यांचे श्रेय त्यानी दिले ते या कार्यक्रमांना आणि उपक्रमांना. आजच्या तरुणांना चांगले मिळाले तर ते ग्रहण करण्यास सक्षम असतात हेच यातून पूर्वी सिद्ध झाले, आज सिद्ध होत आहे व भविष्यातही सिद्ध होईल. बाहेरच्या स्वार्थाने व अनेक गैरप्रथांनी अंधारलेल्या वातावरणात या आदर्श-विद्यार्थीरूपी निरांजनांनी संस्थेबाहेर पडल्यानंतरही आपापल्या परीने प्रकाश पसरविण्याचे पवित्र कार्य चालू ठेवले आहे हे विशेष. या गोष्टीचा सर्वांनाच अभिमान वाटावा अशी ही स्थिती आहे.

11. गतवर्षी चेतानासाठी संचालकांच्या मंजुरीने निश्चित झालेली रक्कम (budgetary amount)चेतनला देण्याचे संचालाकांकडूनच नाकारण्यात आली. I don’t recognize Chetana असे त्यांचे उद्गार होते. पण माजी विद्यार्थी मदतीला आले, त्यांचे चेतना चालूच राहिला पाहिजे असे असंख्य इमेल्स आले, आर्थिक मदत आली आणि चेतना’१० अजून मोठ्ठ्या स्वरूपात साजरा झाला. याचे कारण चेतना काय आहे हे या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. १९९५ पासूनच्या विद्यार्थीमित्रांनी आपापली मते सविस्तरपणे व स्पष्टपणे कळविली. कोणाच्यातरी दबावाखाली येण्याचे व आपली बुद्धी गहाण ठेवण्याचे त्यांना काहीच कारण नव्हते हे जितके खरे तितकेच त्यांच्या आजच्या यशस्वी जीवनाच्या अनेक कारणांपैकी चेतना, गणेशोत्सव, सरस्वती वाचनालय या प्रयोगशाळांचे योगदान हे एक प्रधान कारण आहे हे स्वानुभवाने त्यांना पटले होते. ही सर्व पत्रे (emails) खरोखरीच मन लावून वाचण्यासारखी आहेत. हा एक संशोधनाचा विषयही होऊ शकतो. डोळे असून बघण्याचे धैर्य नसलेल्यांनी ही पत्रे मोकळ्या मनाने जरूर वाचावीत, दृष्टी स्वच्छ व्हायला मदतच होईल. बीज लावण्याची क्षमता नसणाऱ्यांनी निदान वटवृक्ष तोडण्याचे पाप तरी करू नये.

वास्तविक ज्या प्रक्रियेला इतके अफाट यश वर्षानुवर्षे मिळाले आहे, ज्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संस्थेचे दोन अडीच हजार विद्यार्थी आसुसलेले असतात, ज्या प्रक्रियेतून वसतिगृहातील विद्यार्थी आदर्श नागरिक बनण्याच्या वाटेवर चालायला सुरुवात करतात, स्वार्थापलीकडे जावून इतरांचा, समाजाचा, राष्ट्राचा, मानवतेचा विचार करण्यास प्रारंभ करतात, दरवर्षी ६००-७०० बाटल्या रक्त गोळा करून रक्तपेढीला देतात त्या प्रोटोटाईप प्रक्रियेला अभिमानाने संरक्षण देणे, तिच्या पाठीशी उभे राहणे हे खरे म्हणजे प्रत्येक सुजाण, संवेदनशील, सुसंस्कृत, नि:स्वार्थी, नि:पक्षपाती व दूरदर्शी व्यक्तीचे आद्य कर्तव्य असावयास हवे. निदान अडथळे आणण्याचे प्रयत्न तरी करू नयेत.


शिक्षण पद्धतीचे अपुरेपण बर्याच अंशाने पूर्ण करणारी ही दीपकलिका अखंडपणे तेवत राहावी हीच एक सदिच्छा व्यक्त करून हे पत्र पूर्ण करतो. इति लेखनसीमा !


सुरेश नाखरे
६-३-२०११
_________________________

Friday, January 7, 2011

Bokuju and His disciples!

I take an opportunity to write a story below. You will like it.

A story that OSHO had told:

In Japan there was a famous, well-known Guru called as Bokuju. 8 hours of Physical work per day was mandatory to all disciples and also to the Guru. That gave them tremendous physical strength to the body and freshness to the mind and intellect. The Ashram had 500 intellectual disciples. It was a superior kind of Ashram in Japan at that time.

The Guru, Bokuju, turned into oldage. He decided to hand over the responsibility to some ablest disciple. He declared a theme to find his predecessor. He said that 4 lines are to be written on the outside wall of his Kuti. These lines should be constructed in such a way that it will contain the philosophy of all the religions and Dharmas, the essence of his teaching. If he accepts / approves those lines as the best one or the most appropriate one, he will give his position to that disciple and he will go into a Forest for Ekant-vaas.

Few days nobody even decide to construct the lines. They were really afraid of the Guru. If the Guru does not approve the lines, because of the lack of actual experience of the content of the lines, he may scold or beat them for pretentious contents. They all were seeing each others' face that who will take initiative. They were not sure of what they have actually learnt and what way that is actually useful in this context. Reading, writing or chanting for infinite times is different than the Pracheetee. They realised the same. How to extract the essence of what they have learnt for so many years in the past was a real question before them. They were worried for the exposure of their real knowledge as well. They became unsure of everything when the question of taking over the responsibility of Guru flashed before them. Now only inner ability and skill was of any help. The intellect was at the stake. Everybody was eager to take over the Ashram as Guru. But at the same time each one was afraid to appear for the test the Guru has asked them to undergo. They had their ideas for 'Guruship' but they were blank for the immediate solution for the Challenge.

There was most intelligent disciple amongst them. He was knowing everything of each religion and Dharm. So the others pressurized him to take a lead. Ultimately he decided to write the four lines. He designed those lines and wrote on the outside. But immediately after writing those lines he told his close friends that he will not stay in the Ashram but will hide himself just outside the Ashram. He must be aware that the lines that he had written are not the lines he experienced but they are the outcome of the Intellect only, and when Guru will read them he will realize the same.. And then obvious thing will happen. It is better to hide somewhere till the result is out. If Guru does approve the same, then the friends would inform him and then only he would enter the Ashram.

The 4 lines were as below:

" The mind is Mirror.
There is possibility to have dust on the Mirror in daily routine. (due to Karm, vikar etc)
It is possible to remove the dust. (by Satkarm, SadVichar, Satsang).
When the mirror is clear of dust, one can see himself through the mirror. (Self-realisation) "

The lines were perfect and satisfied the condition that they should be the essence of all religions and Dharmas. Actually there was no question of running away from the Ashram. But still the disciple ran away into an hide-out outside the Ashram.

Next day, early in the morning, the Guru saw those lines and immediately shouted for the writer. He asked the other disciples to find out the disciple who wrote these lines. " He needs severe punishment", the Guru said. All the disciples were really shocked. They dispersed immediately. but they started discussing amongst themselves about the decision of the Guru. They even started suspecting the knowledge of the Guru. 'साठी बुद्धी नाठी' ? the back-biting spread over the entire Ashram.

Once few disciples were debating on the same issue, just outside the रसोईघर. They started passing adverse remarks on the Guru. There was a person who was तान्दूळ- कुटया, who was busy in crushing the rice. He was doing the same for years together. Rarely he was seeing or talking to others around. Morning to evening he used to the same thing in a devotional manner. It was the work given to him by Guru when he entered the Ashram many years ago. At that time the Guru asked him the reason of his visit. He said , 'I want to know what is truth. Guru asked, 'whether you want to know about the truth or the truth itself?',. He told that he is interested to know the Truth itself and not something about the Truth. Then Guru gave him this work with a clearcut instruction that he should not see the Guru again, there is no need for it. If required the Guru will visit him at the Kitchen. He became extremely happy that now onwards Guru has taken his responsibility. that day onwards he made himself busy in the rice-crushing work. Others assumed that he is really a mad person and left him isolated for years.

So when the debate was taking place just outside the Kitchen, the person heard it and laugfhed all of a sudden. The disciples asked him the reason. He told that the Guru was right in this case. They challenged his (rice-crusher's) knowledge. He accepted his ignorance and further told that he has forgotten everything what he learnt in the past, including writing and reading skills even. But he remained insistent that The Guru was correct in this issue. Then the disciples forced him to construct and write four lines on the wall outside the Guru's Kuti. He simply denied the same saying that Guru has instructed him not to approach him again. 'If required Guru will visit me', he said. Then they insisted that he should construct the four lines and tell them so that they can go and write. He readily told the four lines,
" Mind is not a mirror at all.
Hence there is no possibility of forming dust on it.
In such case, the question of removing the dust does not arise.
one who understands this, knows everything. "

The disciples wrote those lines on the said wall, during the darkness of the night. Next day all of them were curious about the reaction of their Guru. But when Guru read those lines he immediately declared that catch hold of the Rice-crusher. Nobody else can write these lines. the Guru impatiently ran towards the Kitchen and met the rice-cutter with eager. Guru told, ' now take over the responsibility oif Guru of this Ashram. You are the most appropriate predecessor.' The rice-crusher gestured, 'No I am not the required person. I dont know anything about the preaching and about the philosophy. I know only rice-crushing. I don't want this responsibility.' Guru did not listen, 'I don't know anything now. It is your responsibility to manage the Ashram. I am going. The Guru left and the rice-crusher took over the charge as Guru.

It is said that the Ashram became more popular during his period. Many many ordinary people even got the experience of self-realisation. He used to tell the Teacher, Continue teaching but the teacher must die.'. He used to tell the carpenter,' go on doing the carpentry, but the carpenter must vanish.' He used to tell farmer, 'do the forming in such a way that the farmer must not cease but farming should continue.' People adopted his process having full faith on him and got the ultimate experience of self-realisation. ( ममत्वाचा लोप, अहम् चा विलोप).

The story is over. (The first four lines are appropriate for साधक and next four lines were for सिद्ध).
What is necessary for us is
1. to find the aim for our entire life,
2. to gather the set of values and principles for the travel towards the aim.
3. to start traveling actually towards the aim.
4. to work in a team of like minded people
5. concentrate on self-development and ego-diminishing process (eg Swami Vivelkannad and his seven-eight colleagues in Varahanagar Math for months together and individual travel across the country and at the end the Ramkrishn-Math formation. No need to harp on the number. Intensity and quality of our devotion is important.)
6. to undergo Diligent work/ travel throughout the life.
7. ध्येयावरचा, कामावरचा व स्वत: बद्दलचा दुर्दम्य आत्मविश्वास

What we are doing is part of the work entrusted to us for many lives in the past and future.

SNN